टीम इंडियातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर

Saturday, November 24, 2018
इंग्लंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या टी 20 विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये अनुभवी बॅट्समन मिताली राजला बाहेर ठेवण्याल्याने भारतीय कॅप्टन हरमनप्रीत कौरवर चहुबाजुने टीका होतेयं. क्रिकेट जाणकारांनंतर मिताली राजची मॅनेजर अनीशा गुप्ताने एका ट्वीटमधून हरमनप्रीतचा समाचार घेत तिला अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख म्हटलंय.

अनीशाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, भारतीय टीम खेळावर नाही तर राजकारणावर विश्वास ठेवते हे दुर्देवी आहे. भारत विरूद्ध आयरलॅंड सामन्यात मिताली राजचा अनुभव किती कामी आला हे माहित असूनही हरमनप्रीत जी अपरिपक्व, खोटारडी आणि चलाख आहे, तिला खुश करण्यासाठी मितालीने तिला तिच्या मनासारख करू दिलं. एका वेगळ्या अकाऊंटवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं जे अकाऊंट काही वेळात डिलीट करण्यात आलं.

No comments:

Post a Comment