झाडाला गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

Sunday, August 12, 2018

हिंगोली / प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील राजापूर येथील चांदू तोलबा मुळे यांनी बॅंकेच्या कर्जाला कंटाळून 10 ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. मुळे यांना दोन एकर शेती आहे. यावर भारतीय स्टेट बॅंकेचे एक लाख चाळीस हजार रूपयांचे कर्ज आहे. मागील तीन वर्षापासून असलेल्या नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment