१९ ऑगस्टला हरिद्वारमध्ये अस्थि विसर्जन

Friday, August 17, 2018


नवी दिल्ली - माजी पंतप्रधान , भारतरत्न  अटल बिहारी वाजपेयी यांचे  निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  नमिता भट्टाचार्य यांनी जेव्हा अग्नी दिला तेव्हा सगळेच नेते, उपस्थित हात जोडून उभे राहिले. अटल बिहारी वाजपेयी यांचे पार्थिव पंचत्त्वात विलीन झाले. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांचेच डोळे भरून आले होते. अटलजींच्या अस्थिंचे विसर्जन १९ ऑगस्ट रोजी हरिद्वार येथे करण्यात येणार आहे अशीही माहिती समजली आहे.

No comments:

Post a Comment