ते म्हणाले विद्यापीठातील विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा न होता काही इमारती तात्पुरत्या स्वरूपात अधिग्रहीत करून तात्काळ मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू करावे असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. विद्यापीठ परिसरातील वसंत वसतिगृहावर दोनशे मुले तसेच वसुंधरा वसतिगृहामध्ये पन्नास मुली आणि शेतकरी निवास इमारतीच्या जागी शंभर मुलींच्या वस्तीगृहाची व्यवस्था करण्यात येणार आहे .या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारतींच्या सुविधा व सुसज्जतेसाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
महिनाभरात वसतिगृह सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने कार्यवाही करावी असे त्यांनी यावेळी सांगितले .
याप्रसंगी पोलीस अधीक्षक कृष्ण कांत उपाध्याय, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अण्णासाहेब शिंदे, विस्तार शिक्षण संचालक डॉ.इंगोले, प्राचार्य डॉ. गोखले, कुलसचिव डॉ.लोंढे, तहसीलदार विद्याचरण कडवकर, जिल्हाध्यक्ष अभय चाटे उपस्थित होते.
No comments:
Post a Comment