हिंसक आंदोलन थांबवा , आरक्षण मिळणारच

Friday, July 27, 2018

मुंबई दि २७
मराठा आरक्षणाचा मुद्दा सरकार समोर अग्रस्थानी आहे असे मत माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केले आहे मराठा आरक्षणासाठी मागच्या काही दिवसापासून राज्यात सुरु असलेले हिंसक आंदोलन थांबवावे अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असून सरकार आणि मराठा समाजात या प्रश्नावर मध्यस्थी करण्यास मी तयार आहे आपल्याला मुखमंत्र्यावर विश्वास ठेवावाच लागेल असेही खा राणे म्हणाले . 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.मुख्यमंत्र्यांसोबतच मी मराठा समाज आंदोलकांच्या समन्वयकांचीही भेट घेतली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे हि माझी पण इच्छा आहे माझी त्यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी आरक्षणचा मुद्दा अग्रस्थानी असल्याचे म्हटले. 
इतर राजकारणात मी पडणार नाही.
तोडफोड, जाळपोळीसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचेच नुकसान होत आहे. मुख्यमंत्री बदलाच्या प्रश्नावर ते म्हणाले, या चर्चेत मी पडणार नाही. माझा विषय मराठा आरक्षणापुरता मर्यादित आहे. इतर कोणत्याही राजकारणात मी पडणार नाही. माझ्या अंतर्गत नेमलेल्या समितीने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, ते आरक्षण कोर्टाने रद्द केल्याचे राणे यांनी सांगितले. नारायण राणे समितीच्या अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना, आम्ही दिलेलं आरक्षण हे तामिळनाडूतील आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर देण्यात आले होते. मात्र, सरकार बदलल्यानंतर काही अडचणी आल्या आणि कोर्टाकडून हे आरक्षण रद्द करण्यातआल्याचे राणे यांनी म्हटले.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 9333333548 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment