दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढणार - ना.रामदास आठवले

Tuesday, July 31, 2018




मुंबई दि. 30 - महाराष्ट्रात स्वतःचा हक्काचा सुरक्षित एक लोकसभा मतदारसंघ असला पाहिजे आणि असा मतदारसंघ शोधण्यात केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवलेयशस्वी झाले असून त्यांनी दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून आगामी  लोकसभा निवडणूक  लढण्याचा निर्धार केला 


आहे. याबाबत बांद्रा पूर्व येथे रिपब्लिकनपक्षाच्या मुंबई प्रदेश मधील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेऊन दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेऊन या मतदारसंघातुन लोकसभा निवडणूकलढण्याची ना रामदास आठवलेंनी घोषणा करून  स्थानिक कार्यकर्त्यांनी  कामाला लागण्याचे आदेश ना रामदास आठवलेंनी याबैठकीत दिले असल्याची माहिती 


रिपब्लिकन पक्षाच्या 61 व्या स्थापनादिनानिमित येत्या दि 3 ऑक्टोबर रोजी ठाण्यात प्रचंड महामेळावा आयोजित करून रिपाइं चे शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याच्या पूर्वतयारीसाठी ना रामदास आठवलेंनी मुंबईतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यात रिपाइं चे मुंबईतील सर्व जिल्हा अध्यक्ष आणि प्रमुख पदाधिकारीउपस्थित होते.  

केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले सध्या महाराष्ट्रतुन राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. या पूर्वी ते पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा लोकसभेवरनिवडून गेले आहेत.तसेच पंढरपूर लोकसभा  मतदारसंघाचे विभाजन झाल्यानंतर शिर्डी येथे लोकसभा निवडणुकीत ना रामदास आठवले सन 2009 मध्ये  पराभूत झालेहोते. मात्र सन 1998 मध्ये रिपब्लिकन पक्षाचे चार खासदार लोकसभेत निवडून गेले होते तेंव्हा ना रामदास आठवले हे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून निवडूनगेले होते. त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मदारसंघ हा  ना रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. दक्षिण मध्य मुंबईलोकसभा मतदारसंघात चेंबूर ; अनुशक्तीनगर; धारावी;नायगाव ; वडाळा हे आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले असणारे विधानसभा मतदारसंघ आहेत.या भागातकेंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाची ताकद मोठी आहे. या  मतदारसंघात ना रामदास आठवलेंचा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे हालोकसभा मतदारसंघ सुरक्षित मतदारसंघ असल्यानेच ना रामदास आठवले या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment