आगामी निवडणुकींसाठी महाआघाडी करण्याचे काँग्रेसचे सूतोवाच

Sunday, June 10, 2018


मुंबई दि. ९ मे २०१८
आगामी निवडणुकींसाठी समविचारी पक्षांना एकत्र घेऊन जाण्याचे काँग्रेसचे धोरण आहे असे सूतोवाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
आज गांधीभवन येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. 

या बैठकीत राज्यातील काँग्रेस पक्षाच्या भविष्यातील दिशेसंदर्भात चर्चा करण्यात आली. जवळपास पाच तास चाललेल्या बैठकीत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीकरिता मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. सदर बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, धर्मांध आणि जातीयवादी भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी सर्व धर्मनिरपेक्ष व समविचारी पक्षांनी एकत्र यावे. कर्नाटकप्रमाणे समविचारी पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवता येईल. सर्व समविचारी पक्षांना एकत्र आणून भाजपाविरोधात महाआघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्ष पुढाकार घेईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी १२ जून रोजी मुंबईत येणार आहेत या बैठकीचा अहवाल त्यांना सादर करून यासंदर्भात त्यांच्याशी चर्चा करू असे खा. चव्हाण म्हणाले.

राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे एस.टी. कर्मचा-यांचा संप चिघळला आहे. संपकरी कर्मचारी आणि संघटनांशी चर्चा करून तोडगा काढण्याऐवजी सरकारने एस. टी. कर्मचा-यांवर कारवाई करून दडपशाही सुरु केली आहे. सरकारने एकतर्फी पगारवाढीची घोषणा केल्यामुळे कर्मचा-यांमध्ये संताप आहे. सरकारने कर्मचारी आणि अधिका-यांशी चर्चा करायला हवी होती पण ती केली नाही.  या संपामुळे राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागतो आहे.  सरकारने ताठर भूमिका सोडून द्यावी व कर्मचा-यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घ्यावा असे खा. चव्हाण म्हणाले.

No comments:

Post a Comment