.......तर राम मंदिर प्रश्न २४ तासांत निकाली काढू - योगी

Sunday, January 27, 2019

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावर मोठे विधान केले आहे. राम मंदिरासाठी जनतेची सहनशीलता आता संपत चालली आहे. जर सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर कोर्टाने हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा प्रश्न सोडवू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलेय. राम मंदिराचा प्रश्न तुम्ही चर्चेतून सोडवणार का?, की अन्य दुसऱ्या मार्गाने?, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारल्यावर त्यांनी वरील विधान केले. राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा, अशी जनतेची मागणी आहे. राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यास सुप्रीम कोर्ट असक्षम असेल तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा वाद निकाली काढू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.

कोर्टाने लवकरात लवकर हे प्रकरण सोडवावे, अशी माझी कोर्टाला विनंती आहे. विनाकारण मालकी हक्कासाठी आयोध्या वाद लांबवला जातोय. सुप्रीम कोर्टाने जनतेच्या हितासाठी आपला निर्णय जाहीर करावा. परंतु, विनाकारण याला उशीर होत असेल तर जनतेचा कोर्टावरून विश्वास उडेल, असेही योगी म्हणाले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला २०१४ पेक्षा अधिक जागा मिळतील, असा दावाही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी केला.

मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर, 
Add करा 7083550505 हा आमचा नंबर

No comments:

Post a Comment