कळंब तालुक्यातील डिकसळ येथील सूरज परळकर याचे लातूर येथील १२ नंबर पाटीजवळ लग्न होते. सूरज यांचा मोठा भाऊ महेश यांचे मित्र जीपमधून या विवाहासाठी जात होते. यात ज्ञानेश्वर बब्रुवाहन खंदारे ( २५), जगन्नाथ चंद्रकांत पवार (३२), परमेश्वर जोतीराम अंबीरकर ( ३२, तिघे राहणार डिकसळ), जरीचंद हरिभाऊ शिंदे (३५, युसूफ वडगाव, ता. केज),गणेश मनोहर सोमासे ( ३१, खडकी, ता. कळंब), श्रीकांत अंबिरकर (रा. डिकसळ ) व दत्तात्रय जाधव (रा. कळंब) यांचा समावेश होता.
लग्नाची वेळ दुपारी १२.४० वाजेची होती. ही वेळ गाठण्यासाठी मित्रांची जीप वेगाने चालली हाेती. मुरूड अकोला गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटले, त्यामुळे जीप पुलाचे कठडे तोडून खाली कोसळली. यात ज्ञानेश्वर, जगन्नाथ, परमेश्वर, जरीचंद, गणेश यांचा मृत्यू झाला. तर श्रीकांत व दत्तात्रय गंभीर जखमी झाले आहेत.
No comments:
Post a Comment