नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी राम मंदिरप्रश्नी अध्यादेश लागू करण्यासाठी मोदी सरकारवर दबाव आणण्याचे हिंदू संघटनांचे प्रयत्न सुरूच आहेत. राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेचे हजारो कार्यकर्ते रामलीला मैदानावर धडकले. या कार्यकर्त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी संबोधित केलं. ’राम मंदिरासाठी भीक मागत नाही, कायदा करावा,’ असा म्हणत त्यांनी मोदी सरकारला अल्टिमेटम दिला.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट् वीटर वर फॉलो करा.
संसदेच्या अधिवेशनाआधीच विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर उभारणीच्या मागणीसाठी रविवारी दिल्लीत रॅली काढली. यात हजारो कार्यकर्ते सहभागी झाले. केंद्र सरकारने राम मंदिर उभारणीसाठी कायदा करावा, अशी मागणी या रॅलीद्वारे करण्यात आली.
मराठवाडा नेताच्या ताज्या बातम्या मिळवा तुमच्या Whatsapp ग्रुपवर,
Add करा 9333333548 हा आमचा नंबर
No comments:
Post a Comment